प्रतिनिधी : – नूतन पाटोळे
• हृदय निरोगी राहते
सीताफळमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, राइबोफ्लेविन, थायमिन, नियासीन इत्यादी मुबलक प्रमाणात असते. याशिवाय सीताफळमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, मँगनीज, फॉस्फरस यांचा देखील समावेश असतो. तसेच इतर फळांच्या तुलनेत सीताफळमध्ये अधिक प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. विशेष म्हणजे सीताफळमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते.
• दात होतात मजबूत
सीताफळ हे दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर आहे. सीताफळमध्ये असलेल्या कॅल्शियममुळे दात मजबूत होतात. तसेच सीताफळाच्या झाडांच्या पानाने दात घासल्याने तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीपासून मुक्तता होते. अशक्यतपणा होतो दूर
सीताफळमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियमचा समावेश असतो. मॅग्नेशियमच्या प्रमाणात उपलब्धतेमुळे शरीरातील अशक्यतपणा आणि बिघडलेले कार्य देखील दूर केले जाऊ सकते. सीताफळचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखता येते. तसेच सांध्यातील वेदना कमी करण्यास देखील मदत होते.
• डोळ्यांसाठी फायदेशीर
सीताफळमध्ये असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि आवश्यक राइबोफ्लेविन घटक असतात, जे डोळ्यांची शक्ती संतुलित ठेवतात. डोळे निरोगी ठेण्याबरोबरच डोळ्यांशी संबंधित विविध रोगांशी लढायला संरक्षण देण्याचे काम सीताफळ करते.
• रोगप्रतिकारशक्ती वाढते
सीताफळमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडेंट असतात. जे आपल्या शरीरात अनेक आजारांविरुद्ध लढण्यासाठी सामर्थ्य देतात. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास देखील मदत करतात आणि शरीर निरोगी राहते.
• दम्यावर रामबाण उपाय
सीताफळमध्ये व्हिटॅमिन बी ६ मोठ्या प्रमाणात असते. यामुळे दम्याच्या आजारापासून सुटका होते. सीताफळमध्ये असलेल्या ब्रोन्कियल इन्फेक्शन पासून संरक्षण करण्याचे गुणधर्म त्यात असतात. त्यामध्ये असलेले मॅग्नेशियम हृदय रोगाच्या झटक्यापासून हृदयाचे रक्षण करते.
• मधुमेहासाठी फायदेशीर
सीताफळ मधील फायबर शुगरचे प्रमाण कमी करते. त्यामुळे टाइप – २ मधुमेहाचा धोका कमी होतो. जर तुम्हाला मधुमेह नियंत्रित करायचा असेल तर सीताफळ खाणे लाभदायक आहे.
• त्वचेसाठी लाभदायक
सीताफळमध्ये असेले गुणधर्म चेहऱ्याला चमक आणतात. त्यात असलेले व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडेंट्सची चांगली मात्रा यामुळे त्वचेला मुक्त रॅडिकल थांबवून त्वचेला वृद्धी होण्यापासून प्रतिबंध करते. तसेच त्वचेतील चमक आणि मुलायमपणा टिकवून ठेवते. तसेच त्वचा टाइट होते आणि चेहऱ्याला सुरकुत्या पडत नाहीत.