प्रतिनिधी : – नूतन पाटोळे
मोड आलेल्या कडधान्याला सुपरफूड असं म्हटलं जातं. कारण कडधान्य आरोग्यास खूप फायेदेशीर असतात. कडधान्यात असलेल्या अनेक उपयुक्तत घटकांमुळे शरीराला भरपूर फायदा होतो. त्यामुळे शरीर सुदृढ आणि आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर तुमच्या आहारात नियमित मोड आलेली कडधान्ये समाविष्ट करा.
सर्वच प्रकारची कडधान्ये पचायला सारखी नसतात. काही कडधान्य पचायला जड तर काही हलके असतात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी. त्यानंतर मूग आणि चवळी नंतर उडीद आणि हरभरा, ही कडधान्यही पचायला हलकी असतात. कडू वाल आणि पावटा हे पचायला सर्वात कठीण असतात.
कडधान्य खाल्ल्याचे फायदे
मोड आलेली कडधान्य मध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आढळतात.
मोड आलेलं कडधान्य खाल्ल्याने वातुळपणा कमी होतो.
मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात क जीवनसत्व असतं.
मोड आणल्यामुळे टॅनीन आणि फायटीक अॅरसीड यांचे निरूपद्रवी द्रव्यात रूपांतर होतं. ज्यामुळे शरीराला चांगला फायदा होतो.
मोड आणल्यामुळे कडधान्य हलकं होतं आणि सहज पचतं.
मोड आलेली कडधान्ये वाळवल्यानंतर त्यातल्या कर्बोदकांचं आणि क जीवनसत्वाचं प्रमाण वाढतं.
मोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांची पाचकता लक्षणीय वाढते.
मोड आलेल्या धान्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजं आणि कर्बोदकं असतात. ज्यांचा दररोजच्या आहारात समावेश केल्यास आरोग्य उत्तम राहतं.